धार्मिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
धार्मिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १६ जानेवारी, २०१४

श्री मोहटादेवी

श्री मोहटादेवी
पाथर्डी शहरापासून पुर्वेकडे 9 कि.मी. अंतरावर असणारे पुण्य पावन श्री. क्षेत्र मोहटादेवीगड. येथील देवता श्री. कुलस्वामिनी जगदंबा मोहटादेवी ही आई जगाची आई.

श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।। सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।।

वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।। या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे. ती आईच आहे हीच तिचीमहती.

श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।। श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता. यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।। श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली.

तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करुन मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करुन दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे.
असा आत्मविश्वासू माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला ही सारी किमया महती श्री मोहटादेवीचीच होय.

शरीराचे आणि मनाचिया रोग । न होतीहे भोग प्रारब्धाते ।।

रोगीट शरीर व मन हे आपल्याच कर्मचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहीजे हा प्रेष माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्यसंकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले. नाहीसे झाले की, नाना व्याथी मनास ग्रासुन टोकतात व मनुष्यजीवंत असूनही जीवंतपणाची अनुभुती येत नाही ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊनजगत असताना जीवानंद मिळण्यासाठी प्रत्येक क्षणीशक्ती प्राप्त होते हाच श्री मोहटादेवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती होय.

अनेक भक्तगणांना दृश्य स्वरुपात साक्षात्कार येऊ लागला व श्रीमोहटादेवीची महती गवोगावी पसरु लागली. श्री मोहटादेवीच्या स्वरुपाकडे पाहीले की, कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते हीच पहीली अनुभूती.

म्हशीचा रंग बदलला :-

नित्य श्री मोहटादेवीची ना येथे जाऊन तीर्थ घ्यावे श्री भगवान सिद्धेश्वराचे दर्शन घ्यावे व श्री मोहटादेवीचे दर्शन घेऊन दिवसभर सदाचार संपन्नतेने राहुन सासंसरीक कर्म करावा असा दिनक्रम असताना प्रसंग असा की, एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा चुकारीच्या म्हशी आल्या. चुकारीच्या आलेल्या म्हशी सांभाळून ज्यांच्या असतील ते म्हशचीचे मालक आल्यावर त्यांना देऊ अशीच त्याची इच्छा ईश्वरी लीला व वेगळीच असते. अनेक दिवस वाटपाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांचे नाकेदार यांना कळाले व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला आणि पाचारण करुन बंदिस्त करण्याच आदेश केला. बिचार्या भक्तास खुप दुःख झाले दुःखातून मुक्त होण्यासाठी श्री मोहटादेवीची आळवणी केली. खडा पहारा केला उपवास केला व नवस केला आई यापुढे आम्ही गायी म्हशीचे दुध तुप विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणार देखील नाही. परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहुन आई व श्री मोहटादेवीची कृपा झाली. ईश्वराजवळ कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असते. भक्तांचे कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे याप्रमाणे भक्त साहसी व्हावा, बलवाण व्हावा म्हणूनच भगवान प्रसंग ऊभा करत असतो व त्याचे निवारण ही करतो. दुसर्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतुन म्हशीचा काळा रंग बदलून भोरा (पांढरट) झाला. काल पाहीलेल्या ह्या म्हशी नाहीत बंदिस्ताचा हुकुम रद्द केला. ही सर्व श्री मोहटादेवीची लीला आहे असे वर्णन सर्वांनी केले नाकेदारासह भक्तांनी श्री मोहटादेवीचे दर्शन घेतले. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दुध तुप विकत नाहीत व देवीस अर्पण केल्याशिवाय कात नाहीत. बादशहाच्याही कानी ही वार्ता नाकेदाराकडून कळली उपासना भाग; भिन्न असल्यातरी तत्व एकच आहे. शक्ती एकच आहे. नीतिमत्ता, ही सर्व धर्माचीच शिकवण आहे आणि यातील कार्य करणारी शक्ती म्हणजेच श्री जगदंबा देवी आहे. भेदाभेद सर्व अमंगल ।। अशी बादशहाची वृत्ती पालटली व भ्रम दुर झाला नाकेदारास बढती देऊन श्री मोहटादेवीस विपूल द्रव्यदान दिले सर्वजन आनंदाने श्री मोहटादेवीची महती गाऊ लागले. ही वार्ता सर्वदूरजाऊन देवीची प्रसिद्धी होऊ लागली.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी विश्वासपुर्वक बलयुक्त लोकमान्यटिळकांची प्रतिज्ञा व हजारे महान असे बळवीर म.गांधी, विं.दा. सावरकर, मंगल पांडे, भगतसिंग आहे. स्वातंत्र्यासाठी जीवापाड संघर्ष करत होते. श्री. समर्थ रामदास स्वामी, श्री. संत तुकाराम महाराजादि संत महात्म्ये जन जागृती करत होते काळामध्ये मनुष्यास स्वधर्माचे विस्मरण होत चालले होते. मोह पाशात अडकून मनुष्य पारतंत्र्यास जणू स्वातंत्र्य मानू लागला होता.

या मोहग्रस्त बिकट काळामध्ये, दंडकारण्यप्रदेशी श्री भगवान नवनाथादि संत महात्म्यांच्या पुण्यपावण प्रदेशी श्री छत्रपती शिवरायांना स्वराज्यासाठी प्राणपणाला लावणारे खंबीर बलाढ्य कर्तव्यदक्ष शुरवीरंच्या क्षेत्री, गोदावरी सारख्या पुण्यनदीच्या परीसरात शांतीब्रम्ह श्री एकनाथ महाराजांच्या कृपा छायेमध्ये श्री भगवान वृद्धेश्वर, श्री भगवान मच्छिंद्रनाथ , श्री भगवान कानीफनाथ, श्री भगवान गहिनीनाथ, श्री भगवान जालींदरनाथ, श्री. भगवान नागनाथ यांचे कृपाछत्र आहे. अशा प्रदेशात मनुष्य मोहग्रस्त झाला तर स्वप्रगती, राष्टोद्धार, आत्मोन्नती, जीवनानंद संपुण जाईल व मोठा विनाश ओढवेल. जन्मास येण्याची ही योग्य वेळ योग्य स्थळ आहे श्री क्षेत्र माहुरगडवासिनी आई रेणुकामातेने जाणले आणि लेकरांसाठी श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतिर्ण झाली.

भाविक भक्तांनो,

मोहटागाव व परिसरातील लोक श्री माहुरगड निवासिनी रेणुकामातेची भक्ती निष्ठापुर्वक करत असत. त्या काळामध्ये माहुरला जाण्यासाठी पायी मार्गच असे. पायी दिंडी यात्रा निघायची. साहित्यासाठी बैलगाडी असायची. दररोज पहाटेच उठावे. भूपाळी भावगीत प्रार्थना म्हणावी. सुर्यनमस्कार, व्यायाम, ध्यान, धारणा करावी. स्नान करुन श्री रेणुकामातेची पुजा करावी. नित्य सदाचाराने संस्कृती संपन्न जीवन जगावे व लहानांना आचरणातून धर्म शिकवावा. असाच त्यांचा नित्यनेम. मोहटागावापासून माहुरगडहुन परत गांवी येण्यास जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागायचा. आईचे आशिर्वाद घेऊन पुन्हा आपल्या गावी येऊन व्यवसाय करावा.

आधि प्रपंच करावा नेटका मग परमार्थ सुभटा या श्री समर्थ उक्तीनुसार धन्य तो ग्रहस्थाश्रमः या न्यायाने संसार करावा. संसार सोडून परमार्थ केला अन्न मिळेना खायला अहो कैसा करंट्याला परमार्थ कैसा अशी संसाराची विफलता होणार नाही याची काळजी घ्यावी व जीवनाला परम अर्थ प्राप्त व्हावा असे वागावे असे ते देविभक्त

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।

अशा पद्धतीने धनाचा विनियोग करणारी ती माणस. त्यामुळे त्यांच्याजवळ दैवीगुण संपत्ती टिकुन होती. तर दुसरीकडे समाजामध्ये इंग्रजी वाढती सभ्यतेच्या व मोगलराजवटीच्या मनुष्य अडकू लागला व मोहरुपी पाशांत बांधला जाऊ लागला व भिकाररुपी राक्षसी वृत्ती वाढू लागली.
संमोहात विभ्रमः ।। या मोहादि विकारामुळे बुद्धी मालिन्य, अस्थिरपणा, उदासमनोवृत्ती, निष्क्रियता, आत्मवंचकता अगतिका आदि दुर्गुण व दुरावस्था प्राप्त होते व विनाशाकडे मनुष्य जाऊ लागतो. म्हणूनचा श्री भगवती श्री भगती रेणुकामातेने श्री मोहटादेवीच्या रुपाने अवतार धारण करुन या विकाररुपी मोहरुपी राक्षसाचा वध करुन समाजास दिव्यदृष्टी शक्ती, बुद्धि देण्याचे कार्य केले.

अनेक वर्ष वारी करणारे मोहटागाव व परीसरातील भक्त गणामधील हरी गोपाल, बन्सी दहिफळे या वृद्ध भक्ताने आर्ततेने देवीची प्रार्थना केली. आई शरीर थकले आहे. पायी वा बैलगाडीतून देखील तुझ्या भेटीला येणे शक्य वाटत नाही. तुझा वियोग तर असाह्य होतो. आई तु आम्हास सोडू नको आई, आई असे म्हणून डोळे भरुन आले. तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले व मौनेची करावा नमस्कार दोन्ही हात तिसरे मस्तक यांनी साष्टांग नमस्कार केला.

देव भावाचा मुकेला हाचि दुष्काळ तयाला ।।

भक्त मंडळी शांत झोपी गेली. पहाटेच्या सुमारास भक्तांस दृष्टांत झाला. बाळा, ती तुझ्या बरोबरच आहे. घाबरुन नकोस. विश्वास ठेव मी सर्वत्र आहे. हे शब्द जाग आली तर समोर कुणीच नाही. पुन्हा तोच आवाज तेच शब्द.

दुसर्या दिवशी पुन्हा दृष्टांत व शब्द ध्वनी ऐकताच दिव्य मुर्ती समोर सारया भक्तांचे डोळे दिपले. भव्य प्रकाश साध्या डोळ्यांना पाहावत नव्हता पुन्हा तोच ध्वनी कानांवर. भक्तांचे देहभान हरपले. भावसमाधीतून भानावर आले व सर्वांना महान असा आनंद झाला. व जीवनात नवचैतन्य निर्माण झाले. नामस्मरण करीत मोहटागाव जवळ करु लागले व आई कुठे पुन्हा भेट देईल या क्षणाची स्थळाची वाट पाहु लागले.

भक्तांच्या बरोबर दैवीगुणसंपन्न अशी एक पांढरी शुभ्र नित्यदुध देणारी गाय होती. ती गाय अचानक धावत निघाली ती पुन्हा शोध घेऊनही सापडलीच नाही. यात्रा मुक्काम करीत, दिनक्रमाने नित्योपासना करीत चालू होती. एक दिवस यात्रेतील भक्तांनी बाबांना विचारले बाबा, देवी आपल्याबरोबर आहे मग दिसत का नाही, बोलत का नाही. बाबांनी उपदेश केला, अरे वेड्या कलियुगात भगवंताने मौन धरले, बैद्ध अवतार धारण करुन विटेवर उभा राहुन तो दिव्य शक्तीने भक्तांचे पालन पोषण करतो.

केवळ दिसते तेच सत्य असते काय ? हवा दिसत नाही मग हवा नाही काय ? सुगंध दिसत नाही मग नाही का ? पहाणे हा डोळ्याचा विषय, वास घेणे हा नाकाचा विषय ? नाक दाबले की हवेची सुगंधाची, दुर्गधाची इनुभुती येते व हवा आहे सुगंध आहे हे कळते. साध्या डोळ्यास जे दिसत नाही त्यासाठी भिंगाचा उपयोग करतात.
तसा देव हा अनुभवाचा विषय आहे व तो पाहण्यासाठी दिव्यदृष्टी लागते. दुर्लभ असे वाघीणीचे दुध प्राप्त झाले तर घेण्यासाठी सोन्याचे भांडे लागते. तसा भक्तांच्या ठिकाणी अंतःकऱणाचे योग्य पात्र झाले की, मनुष्य ओळखू येतो, त्यानंतर साधु ओळखता येतो व मग देव कळतो.

मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्य़देवोभव, अतिथिदेवोभव ह्या पायरया चढल्या की मंदिरातील आईचे दर्शन होते असा उपदेश केला नित्य कथा, कीर्तन, नृत्य, गीत गायन करती यात्रा मोहटागावी पाहोचली. पुन्हा पहाटे तोच दृष्टांत तो ध्वनी आवाज बाळा, अरे तुमच्या बरोबरच गावी आले.

सकाळी गुराखी मुलांनी गुरे सोडली व वनात चरण्यास घेऊन गेली तर उंच डोंगराच्या पायथ्याशी एक तेजसंपन्न सुंदर स्त्री दिसली मुले जवळ जातात तो ती गुप्त झाली. मुले भयभयीत झाली. काहीमुले उंच डोंगरावर गेली तर त्यांना यात्रेतून पळून गेलेली पांढरीशुभ्र गाय पहावयास मिळाली. ही वार्ता मुलांनी गावात येऊन सांगितली. श्री. भगवान सिद्धेश्वरनजीक गावालगत ओढा असून त्या ठिकाणी एक ढोह आहे. सुंदर तेजपुंज स्त्री स्नान करीत आहे. असे पहाटच्यावेळी पाणी आणण्यासाठी गेलेल्या काहीसुवसिंनी स्त्रिया यांना दिसून आले. आजी, कुठल्या तुम्ही ? अग मी याच गावची आहे. तुमच्यासाठीच मी इथे रहाते; असे सांगितले आणि पहाता पहाता ती म्हतारी गुप्त झाली. ही वार्ता संपुर्ण गावात कळाली जो तो विचार करु लागला. सारा गावा श्री सिध्देश्वराजवळ जमला. देवीची प्रार्थना करु लागला. दहिफळे बाबांना भावसमाधी लागली. एवढ्यात कानांवर पुन्हा आवाज माझ्या पाडसांनो, मी तुमच्यासाठी माहुरगडांवरुन आले. उंच डोंगरावरुन गाईने हंबरडा फोडला. सारा गाव धावत धावत आई श्री. रेणुकामातेची गर्जना करीत करीत उंच डोंगरावर पोहचला आणि पाहतात तो जिथे गाय उभी त्याच ठिकाणी भव्य, दिव्य तेजपुंज असा शेंदराचा तांदळा. श्री भगवान परशुरामांसाठी जशी माहुरगडांवर श्री रेणुकामाता प्रगट झाली तशी मोहटा गावच्या परशुरामासाठी आई श्री रेणुकामाता प्रगट झाली. सर्वभक्तगणांचे मन आनंदाने भरभरुन आले. गाय नाचे उडे आपुलीया छंदे । आनंदू रे आजि आनंदुरे । अशी अवस्था झाली सर्वजन आनंदोत्सव साजरा करु लागले व श्री मोहटा देवीचे दर्शन करु लागले एवढ्यात झोपेतून कुणी हालवून जागे करावे तसा आवाज आला, अरे उठ जागा हो, विकाररुपी राक्षसाचा वध करुन स्वधर्म संस्थापनेसाठी मी येथे प्रगट झाले, सर्व जण सर्व इंद्रियांचे कान करुन तो आवाज ऐकत होते व श्री मोहटादेवीकडे टक लावून पहात होते. पुन्हा तोच तोच आवाज ऐकु यायचा सर्वांना महत आश्चर्य़ वाटले दिव्यशक्तीची अनुभूती आली आणि सर्वभक्तागणांनी साष्टांग दंडवत घेतले व आइची प्रार्थना केली आई ग आम्हांस सांभाळ.
तो पुण्य पावन दिन म्हणजे आश्वीन शु. 11 म्हणुनच या दिवशी लाखोंच्या संख्येने भावीक श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर येतात व आनंदोत्सव साजरा करुन श्री मोहटादेवीचे दर्शन घेतात.

ती प्रथम मोहाच्या झाडाखाली दिसली म्हणुन मोहस्थिमाता, उंच डोंगरावर प्रगट झाली तिच जागृत, स्वयंभू, नवसासपावणारी, विकारुपी मोहरुपी वध करणारी, त्रिगुणात्मिका, श्री क्षेत्र माहुरगड निवासिनी श्री रेणुकामाता प्रगट झाली तिच मोहटाग्राम निवासीनी श्री मोहटादेवी होय. तिच्याच नांवे श्री क्षेत्र मोहटादेवी गडाची स्थापना झाली व प्रसिद्धी झाली.

या दिव्यांनंदामुळे मोहटागांव व परिसरातील भावीक भक्तांनी भक्तांच्या सोयीसाठी, नित्योपासना पुजा अर्चादी विधीसाठी भव्य, दिव्य, कलासंपन्न असे दगडी मंदीर उभारणीचा संकल्प केला आणि मंदीर शिखरासहीत श्री मोहटादेवीच्या कृपेने पूर्ण झाले.

उपासना भक्ती पूजामद्ये ध्यानमग्न असणार्या भावीक भक्तांना श्री मोहटादेवीचा साक्षात्कार होऊ लागला, कृपेची नित्य अनुभूती येऊ लागली व मोहटागांव व परिसरामध्ये गांवोगांवी ही वार्ता पसरु लागली आणि भावीकांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली. नवसाच्या माध्यमाने द्रव्य रुपात, वस्तु, धान्य स्वरुपात देणगी जमा होऊ लागली व ग्रामस्थांनी भव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मानवी जीवनामध्ये इतर व्यक्तीकडून एखादे काम झाले मदत झाली तर कृतज्ञता म्हणून मनुष्य उपकाराची वाहवा करतो, सामाजीक उद्धार, राष्ट्रोद्धार कार्य झाले मनुष्य अशा महान राष्ट्रोद्धार करणार्या व्यक्तींचा जयजयकार करतो

ओम नमोजी आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्ववंवदेया आत्मारुपा । माऊली ज्ञानदेवाने नमन करुन स्वंवेद्य आत्मरुपाचा जयजयकार केला व हृदयमंदिरात पूजा केली. यानुसारच दिव्यांनंदाने भक्तगणांनी मंदीर उभारणीचे कार्य सुरु केले व दिसेल ते काम करु लागले.

गडावर येण्यास निकटमार्ग. निश्चयात्मक श्रद्धायुक्त अंतःकरण असल्याने महत कष्टाने खाणीद्वारे मोठ मोठे दगड माढून, उत्तम कलासंपन्न दगडी खांब, चीरे कमान, इ. निर्माण करुन चार चौघांनी एकत्र येऊन खांद्यावर घेऊन गडावरती आणले. उत्तम कारागीराकडून काम सुरु झाले. आणि पाहता पाहता दीपमाळ, सभामंडप, प्रवेशद्वार, यासह मंदिराची ऊभारणी होऊन विविध देवदेवता, साधसंत यांच्या मुर्तीसह उंच असे शिखरासह मंदिराचे बांधकाम श्री. मोहटादेवीच्याच कृपाशिर्वादाने पूर्ण झाले.

श्री भगवान जगदगुरु ज्योषपीठाचार्य 1008 श्री शंकराचार्य़ महाराज यांच्या परमपावन शुभहस्ते अनेक साधुसंत महात्म्याच्या उपस्थितीत अध्यक्षांसह व्यवस्थापन समिती, कर्मचारी वृंद व ग्रामस्थ, हजारो भावीक भक्तांच्या मेळाव्यामध्ये शास्त्रविधीवत कलशारोहन कार्यक्रम श्री मोहटादेवीनेच करुन घेतला.
सौजन्य - http://www.shrimohatadevi.org/

रविवार, ११ ऑगस्ट, २०१३

व्यंकटेश बालाजी देवस्थान देवराई

  भाविकांचे श्रद्धास्थान देवराई येथील  व्यंकटेश बालाजी देवस्थान 

पाथर्डी तालुक्यातील  देवराई येथील ग्रामदैवत असलेल्या व्यंकटेश बालाजी  हे जिल्ह्यातील नाथ परंपरेतील प्राचीन व धार्मिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते .या देवस्थानला पूर्वी ग्वाल्हेरच्या तत्कालीन राजाकडून सनद पुरवली जात होती
सुमारे २००० वर्षाचे हे प्रचींन मंदिर हेमाडपंथी स्वरुपात उभे होते. आता मात्र येथे मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. याच मंदिराजवळ ऎतिहसिक बारव आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते . या  वेळी राज्यभरातून मोठ्या  संख्येने भाविक येथे येतात .तसेच गोकुळाष्टमी निमीत्त येथे धार्मिक कार्यकामचे आयोजन केले जाते . देवराई गावाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गावापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे मच्छिंद्रनाथाल व गोरक्षनाथ यांनी सोमयाग यज्ञ घातला. यावेळी सर्व देव देवतांना आमंत्रित करून महाप्रसादाचे आयोजन केले .त्यावेळी उपस्थित देव देवतांनी भोजनासाठी जेथ पयंत रांगा लावल्या ते ठिकाण म्हणजे देवराई अशी या गावाची ओळख आहे. यज्ञ सांगतेनंतर उपस्थित देव देवतांना सन्मानित करून धन धान्य सुवर्णमुद्रा व अलंकार देऊन स्वगृही पाठविण्यात आले. 
    उर्वरित संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी  भगवान विष्णू अर्थात व्यंकटेश बालाजीवर टाकून भगवान आदिनाथ वृद्ध रुपात येथेच थांबले तेच हे प्रसिद्ध ठिकाण  श्री क्षेत्र वृध्देश्वर म्हणून ओळखले जाते. म्हणून  धन धान्य पैसा  आदीचे रक्षण व्यंकटेश बालाजी करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री क्षेत्र वृध्देश्वरला व मढी ला दूरवरून दर्शनासाठी येणारा भाविक प्रथम देवराई येथे व्यंकटेश बालाजी चे दर्शन घेऊन पुढे जातो. 


मंदिराचा जीर्णोद्धर :-
सन २००९-२०१० या कालावधीत  मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून खासदार दिलीप गांधी याच्या निधीतून सभामंडप तर ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने मंदिरचे काम चालू आहे . दोन वर्षापूर्वी राजस्थान येथून आणलेली काळ्या स्फटिकाची आकर्षक बालाजीची मूर्ती विधिवत बसविण्यात आली आहे मंदिराचे शिखर व गाभारा व सभामंडप अशी आकर्षक स्वरुपाची कामे करण्यात आली आहे. 

 इतर पूर्ण झालेली कामे    :-

  1. संकटमोचन हनुमान मंदिर :- हनुमानच्या मूर्तीची स्थापना रामदास स्वामीनी केलेली आहे. ही मूर्ती दक्षिण मुखी असून तेलाची आहे. २००८ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. 
  2. रेणुका माता मंदिर :- रेणुका माता देवीचा आकर्षक  अशा तांदळा आहे. तसेच शिखराचे सुंदर असे काम नांदेड येथील कारागिराने पूर्ण केले असून मंदिराचे आतील संपूर्ण काम देवराई येथील भक्ताने पूर्ण केले आहे. 
  3. जि. प. सदस्य अर्जुनराव शिरसाठ  यांच्या निधीतून पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
  4. देवराई ग्रामपंचायतने मंदिर परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रेटचे काम पूर्ण केले.              
             यात्रा उत्सवतील  विविध कार्यक्रम
  येथील बालाजीची यात्रा ऑगस्ट महिन्यात असते. बालाजीला पैठण वरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने रात्री १२ वाजता म्हणजे  गोकुळाष्टमी  च्या दिवशी  जलाभिषेक घातला जातो. याच दिवशी भाविकांनी आणलेल्या कवडीची मिरवणूक काढली जाते यावेळी फटक्याची आतिषबाजी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची पोथी वाचली जाते . तसेच बालाजी सार्वजनिक ट्रस्ट कडून विद्ययुत रोषणाई केली जाते .

सोमवार, २५ फेब्रुवारी, २०१३

शनी-शिंगणापूर



अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीजवळ वसलेल्या शिंगणापूर गावात शनीचे हे मंदिर आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. शनी देवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते.

कथा

येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही, असेही सांगितले जाते. शिंगणापूर गावाच्या हद्दीच्या आत साप चावल्यास संबंधित व्यक्तीला शनिदेवाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात.
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेलवाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.

साईबाबा



   श्री बाबांचा जन्म महाराष्ट्रातील पाथरी या खेड्यात भुसारी कुटुंबात झाला. पण ते लहान असताना त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे संगोपन एका मुस्लीम फकिराने केले. नंतर बारा वर्षे त्यांनी योग्यांच्या सहवासात राहून आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतली. साधना करण्यातही त्यांनी काही काळ व्यतीत केला. नंतर ते हुमणाबादच्या श्री माणिक प्रभूंच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना आशीर्वाद मिळून शिर्डी येथे राहण्याची त्यांना आज्ञा झाली. माणिक प्रभू यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले होते. प्रभू हे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. बाबा त्यांना मानत होते.  
 
     औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावची चांदभाई ही एक श्रीमंत व्यक्ती. औरंगाबादची सफर करण्यास चांदभाई गेला असता त्याची घोडी हरवली. त्याने सर्व जंगल शोधले, परंतु घोडी त्याला सापडली नाही. निराश बनून खोगीर पाठीवर मारून तो परत जाऊ लागला. एवढ्यात ''चांदभाई !'' अशी हाक त्याच्या कानी आली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. त्याच्या दृष्टीस एक तरुण फकीर दिसला. अंगात लांब पांढरी कफनी, काखेत सटका, हातात टमरेल. डोक्यास घट्ट बांधलेले फडके व पाय अनवाणी. ''इकडे ये.'' अस म्हणून तो फकीर एका झाडाखाली बसला. 'याला माझे नाव कसे माहित? याला मी पूर्वी कधी पाहिलेलं नाही!' असा विचार करीत तो त्यांच्याकडे गेला.
 
     ''बराच थकलेला दिसतोस ! बैस जरा. चिलीम पिऊन जा. काय रे, हे खोगीर कसे तुझ्याकडे?'' तो म्हणाला, ''माझी घोडी हरवली आहे. ती सापडण्याची आशा  उरलेली नाही ! सर्व जंगल धुंडाळले!'' बाबा म्हणाले, ''ते पलीकडे कुंपण आहे. तिथ जा. तुझी घोडी सापडेल.'' चांदभाई तेथे गेला. त्याची ती हरवलेली घोडी तेथेच चरत होती. ''या अल्ला, माझी घोडी सापडली.'' चांदभाईला आनंद झाला. ती घोडी घेऊन तो फकिराकडे आला. फकीर तंबाखू चुरीत होता. ''सापडली न घोडी! आता चिलीम ओढ!'' फकिराने चिलमीत तंबाखू भरली. ''पण ही पेटवणार कशी? इथे विस्तव कुठे आहे? शिवाय छापी भिजवायला पाणीही नाही.'' चांदभाई म्हणाला.
 
     फकिराने हातातील सटका जमिनीत खुपसताच आग उत्पन्न झाली. त्यातून रखरखीत निखारा बाहेर काढला. सटका जमिनीवर आपटताच त्यातून पाणी निघू लागले. छापी भिजवून ती पिळली. मग ती चिलमी सभोवती वेष्टिली. चिलमीतील तंबाखूवर तो प्रदीप्त निखारा ठेवला. फकिराने चिलीम स्वतः ओढून चांदभाईला ओढण्यास दिली. चांदभाई स्तिमित झाला. त्याने त्या फकिराच्या पायावर मस्तक ठेवले. 
 
     ''अल्ला मलिक !'' असे म्हणून बाबांनी चांदभाईला वर उठवले व ''अल्ला भला करेगा'' असा आशीर्वाद दिला. ''बाबा, तुम्ही माझ्या घरी चला !'' ''जरूर येईन मी !'' चांदभाई तिथून निघाला. दुसऱ्याच दिवशी तो फकीर धूपखेडे गावात गेला व चांदभाईच्या घरासमोर जाऊन उभा राहिला. चांदभाई खुश झाला. फकिराचे त्याने आदराने स्वागत केले. उत्तम प्रकारे आतिथ्य केले. काही दिवस तो फकीर त्याच्याकडे राहिला. नंतर चांदभाईच्या पत्नीच्या भाच्याची सोयरिक शिर्डीच्या एका मुलीशी झाली, तेव्हा तो फकीर चांदभाईच्या विनंतीला मान देऊन लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीस आला. वऱ्हाड घेऊन आलेल्या गाड्या खंडोबाच्या देवळापाशी असलेल्या मळ्यात थांबल्या. सर्वजण गाड्यातून उतरले. तो फकीरही उतरला व खंडोबाच्या देवळात गेला. तिथे म्हाळसापती खंडोबाचे भक्त पुढे आले व आदराने म्हणाले, ''या साई!'' तो तरुण फकीर म्हणजेच साईबाबा. 
 
     बाबा  शिर्डी येथेच राहत. शिर्डीमध्ये ते भिक्षा मागण्यासाठी फिरत. त्यांना कोणी त्यांच्याबद्दल विचारले असता, ''हम तो साई है, बहुत दूरसे आये है!'' असं ते सांगत. एकदा धुळ्याचे श्री. नानासाहेब जोशी शिर्डीस आले. त्यांनी बाबांना विचारले, ''तुमचे नाव काय?'' यावर बाबा म्हणाले, ''मला साईबाबा म्हणतात.'' 
 
     बाबा कधी लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसत, तर कधी तिथल्या पडक्या मशिदीत जाऊन बसत. ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांना व चार वर्णांना तिथे सर्वच द्वारे खुली असतात. त्या परम पवित्र मंगल स्थानाला तत्त्ववेत्ते विद्वान 'द्वारका' म्हणतात. साईबाबा एक रात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकारी चावडीत राहात, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मशिदीत येत. 
 
     ती मशीद म्हणजे बाबांची द्वारकामाई. तेथे शिरताना समोरची जी भिंत दिसते ती कृष्णाची. गोपालकृष्ण गोकुळात गोपालांसह काल्याचा आनंद उपभोगीत. बाबासुद्धा नाना प्रकारच्या जिनसा आणून त्या एकत्र करून एका मोठ्या हंडीत चांगल्या शिजवून आपल्या भक्तांना स्वतः वाटीत असत. एकदा चुलीजवळ शंभराहून अधिक माणसांना पुरेल इतकी मोठी हंडी शिजत होती. चुलीखाली लाकडांचा जाळ धगधगत होता. बाबा आपल्या एका भक्ताला म्हणाले, ''अरे, बघत काय राहिलास? जरा ती हंडी ढवळ!'' तेव्हा तो भक्त उलथणे शोधू लागला. बाबा झटकन त्या हंडीकडे गेले व आपल्या कफनीच्या अस्तन्या वर करून आपला उजवा हात कोपरापर्यंत त्यांनी त्या हंडीत घातला व ते पदार्थ ढवळू लागले. बाबांच्या हाताला काही झाले नाही. बाबांचे जीवनकार्य हा एक चमत्कार होता.
 
     बाबांना दीपोत्सवाची मोठी हौस होती. बाबा टमरेल घेऊन दुकानदार वाण्यांकडे जात व त्यांच्याकडून तेल मागून आणत. पण त्यांना ते मनापासून देत नसत. बाबा ते तेल पणतीमधे भरी. चिंध्या काढून त्याच्या वाती वळीत. रात्री त्या मशिदीत पेटवित. त्या रात्रभर जळत असत. दिवाळीचा सण होता. बाबा नेहमीप्रमाणे सर्व दुकानदार वाण्यांकडे गेले. त्यांना कुणी तेल दिले नाही. ''आज तेल नाही. संपले.'' असेच त्यांना सर्वच दुकानदार वाण्यांनी सांगितले. बाबा निमूटपणे मशिदीत आले. आता हा फकीर मशिदीत कशा पणत्या पेटवतो हे पाहण्यासाठी ते सर्वजण मशिदीसमोर जमले. बाबांनी त्यात पाणी ओतले. आणि कांडे ओढून ते एक एक पणती पेटवू लागले. मशिदीत दीपमाळा उजळली. मजा पाहण्यासाठी आलेले दुकानदार बाबांच्या चरणी लीन झाले. 
 
     आजारी माणसे, रोगपीडित माणसे बाबांकडे येत. बाबा त्यांना वनस्पतींपासून स्वतः बनवलेली औषधे देऊन बरे करीत असत. जेव्हा जास्तच गर्दी वाढू लागली, तेव्हा बाबा औषधाऐवजी धुनीची उदी सर्वांना देऊ लागले आणि आलेले बरे होऊ लागले. भक्तांचे दुःख आणि दुखणे आपल्या अंगावर ओढून ते स्वतःच भोगीत असत. पुष्कळदा ते अनेक व्याधींनी जर्जर असत. भक्तांचे दुर्धर असाध्य रोग आपल्या अंगावर घेऊन ते भयंकर शारीरिक दुःख स्वतःच भोगीत. दाह व वेदना ते सहन करीत व भक्तांना वाचवीत. बाबा भक्तांना त्यांच्या स्वप्नात आणि प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना उदी लावीत असत.
 
     बाबा भक्तांच्या संकटसमयी त्यांना सहाय्य आणि दिलासा देण्यासाठी दिशा आणि काळाची बंधने तोडून हजारो मैलांवर तत्क्षणी प्रकट होत. आपल्या असंख्य भक्तांना निरनिराळ्या रूपांनी प्रकट होऊन बाबांनी वाचविले आहे.      
    
     पुढे बाबा आजारी पडले. त्यांचे दुखणे प्रबळ झाले. भक्त तळमळू लागले. १५ ऑक्टोबर १९१८ हा दिवस उजाडला. त्या दिवशी विजयादशमी होती. बाबांची अवस्था कठीण होती. काही क्षणानंतर बाबांनी जवळच बसलेल्या बयाजी अप्पा कोते यांच्या अंगावर डोके टेकले. संपले सारे ! 
 
शिर्डीस ज्याचे लागतील पाय l
टळती अपाय सर्व त्याचे ll
माझ्या समाधीची पायरी चढेल
दुःख हे हरेल सर्व त्याचे ll 

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

श्री दत्तधाम चांदा!!!


श्री दत्तधाम चांदा!!!

अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे . अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर मोहता देवी , देवगड नेवासा ई. हि सर्व ठिकाणे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी .
अशाच या नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकापासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे - औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी - शिंगणापूर पासून ११  किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्यामार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे .. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. . अनेक थोर संत महापुरुषांचे वास्त्यव्य या गावात झाले आहे .जुन्या काळी जेव्हा मोघालांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराज सुद्धा या गावात आले होते . आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे . आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय .
श्री दत्त साधकाश्रामाची सुरुवात प पु गु ह भ प श्री संत रोहीदासजी महाराज यांनी केली . त्यांनी त्यांच्याकठोर तपश्चर्येचे प्रतिक म्हणून हा आश्रम उभारला आहे. प पु गु सद्गुरू  रोहीदासजी महाराज हे मुलाचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सूर होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेद होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे ठरवले. व या ठिकाणाला अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन श्री दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने आवळून आणलेली श्री दत्त मूर्तीची स्थापना केली. याच श्री दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसन ग्रस्तांना व्यसन मुक्त केले. व अनेकांना भगवंताचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर मध्ये अध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही. 
सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे. 
दत्त साधकाश्रामच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो .
त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे.
येथील  वर्षातील महत्वाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे...
१. गुरुपोर्णिमा - आषाढ शुध्द पोर्णिमा
२. तुकारामबीज सप्ताह - फाल्गुन बीज - ध्यान शिबीर ७ दिवस
३. दत्त जयंती सोहळा - डिसेंबर